काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मते वगळल्याचा आरोप केलाय. त्यानंतर राजुरा चर्चेत आलंय. काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. भाजपचे देवराव भोंगळे हे विजयी झाले. निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18 हजार मते वाढली. एवढी माते कशी वाढली, याचा संशय आल्याने धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली. त्यावरून सुमारे सहा हजार मते आयोगाने कमी केली. उरलेल्या अकरा हजार मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा आरोप धोटे यांचा आहे. तर मतदार वाढ ही नैसर्गिक आहे. प्रत्येक निवडणुकीत अशी वाढ होताच असते, असं म्हणत भोंगळे यांनी आरोप फेटाळलेत.