राज्यातील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर आजपासून राज्यात शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र, तीव्र उष्णतेची लाट आणि कडक उन्हामुळे विदर्भातील शाळा आजपासून म्हणजेच १५ जूनपासून सुरू होणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या हस्तक्षेपानंतर आणि पालकांच्या मागणीचा विचार करून विदर्भातील शाळांची तारीख बदलण्यात आली आहे