पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावाची आग पूर्णपणे विझली नसून, आजही (१ ऑगस्ट २०२५) गावात तणावपूर्ण शांतता आहे. 'यवत कुणी पेटवलं?' असा प्रश्न आता स्थानिकांसह सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने यवतला भेट दिली असून, NDTV मराठीने तणावग्रस्त यवत गावात जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.