महाराष्ट्रात ठाकरे नावाची एक ताकद आहे. बाळासाहेबांच्या उमेदीच्या काळात महाराष्ट्रानं या ठाकरेंच्या ताकदीचा जबरदस्त करिश्मा अनुभवला. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून शिवसेना सांभाळत होते. मात्र माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे असं म्हणत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आता वीस वर्षानंतर ठाकरेंची ही ताकद पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार कसं फिरेल महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहूयात.