अखेर भाजपनं पश्चिम बंगालचा गड काबिज केलाच. ममता बॅनर्जींच्यां १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावलाच. या विजयाचं मूळ लपलंय ते भाजपच्या प्रचारात. यंदाच्या प्रचारात भाजपनं बांगलादेशी घुसखोरांवरून रान पेटवलं होतं. आणि याचीच भीती चक्क बांगलादेशींनाही आहे असं दिसतंय. कारण निकालाच्या अगदी काही दिवस आधीच तिथल्या एका खासदारानं भाजप सत्तेत आली तर बांगलादेशींसाठी धोका असल्याचं म्हटलंय. पाहूया बांगलादेशींनी भाजपच्या सत्तेचा धसका का घेतला आहे तो...