जळगावमध्ये उमेदवारीवरून भाजपच्याच दोन मंत्र्यांचे मतभेद उघड झालेत... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.. भाजपच्या उमेदवारीवरून हे मतभेद पाहायला मिळताय... उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्याचा निर्णय हा कायम गिरीश महाजन यांनी घेतला आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी म्हटलंय... विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीबाबत ही निर्णय हा गिरीश महाजन यांचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.. दरम्यान, यावरून गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय.. नंदकिशोर महाजन माझा उमेदवार आहे असा त्यावर शिक्का आहे का? असा सवाल त्यांनी केलाय..