लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ‘मोफत’च्या घोषणा केल्या. पण याच काळात वीज थकबाकी वसुलीकडे ‘महावितरण’चे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची माहिती मिळतेय.. सर्व ग्राहकांच्या वीज बिलाची थकबाकी तब्बल ९८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. कृषीपंपांच्या बिलांची थकबाकी ७५ हजार कोटींहून अधिक आहे. थकबाकीचा आकडा फुगत चालला असून,त्याने एक लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे.