आषाढी वारीचे निमित्ताने यंदा विठ्ठल मंदिर परिसरातील वाहतुक मार्गात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रथमच विठ्ठल मंदिर परिसर हा वनवे करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलाय. त्यामुळे वारकरी भक्तांना कुठल्याही अडथळ्याशिवाय मंदिर परिसरात वावरणे सहज शक्य होणार आहे. गर्दीच्या किंवा चेंगरा चेंगरी सारख्या परिस्थितीतही कुठल्याही प्रकारची आपत्ती येणार नाही. यासाठी वनवेचा पर्याय मंदिर परिसरात आषाढीच्या निमित्ताने महत्त्वाचा मानला जातोय.