अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन टंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतय. बहुतांश पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने “इंधन उपलब्ध नाही” असे फलक झळकू लागले आहेत. आधीच इंधन दरवाढीमुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना आता प्रत्यक्ष इंधन मिळणंही कठीण झाल्याचं चित्र आहे.तर अनेक पंप बंद असल्याचे फलक लागलेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.