राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतंच सम्राट अकबराबाबत केलेलं एक विधान वादात सापडलंय. सम्राट अकबराचा विवाह जोधाबाई यांच्याशी झाल्याचा दावा आत्तापर्यंत केला जात होता. यावर एक अख्खा चित्रपट देखील बॉलिवूड मध्ये प्रदर्शित झालाय. पण हरिभाऊ बागडेंनी हे दादांत खोटं असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर सम्राट अकबराच्या कारकिर्दीचा इतिहास सांगणाऱ्या अकबरनामाचा दाखला बागडे यांनी यासाठी दिला आहे. आणि त्यामुळे आता या मुद्द्यावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.