लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे रेणा, मांजरा आणि तेरणा नद्या वाहू लागल्या आहेत. मांजरा नदीवरील सहा बॅरेजेस तर तेरणा नदीवरील तीन बॅरेज भरलेत. एकट्या मे महिन्यातील तेवीस दिवसात शेतकऱ्यांची नव्वद जनावरं आणि तीन व्यक्तींचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.