नेपाळमध्ये जे झालं तेच आता आफ्रिकन देश असलेल्या मादागास्करमध्ये झालंय. पाणी आणि वीजेची टंचाई, सोबतच भ्रष्टाचार आणि गरिबीमुळे तरुणाई रस्त्यावर उतरली. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. पण तरुणाईच्या रेट्यापुढे सरकारलाही गुडघे टेकावे लागले. मादागास्करचे राष्ट्रपती एन्ड्री राजोइलिना यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आलीय. मादागास्कर आफ्रिकेत असला तरी भारतासोबत त्या देशाचे संबंध चांगले होते... त्यामुळे मादागास्करमधील आंदोलन आणि सत्तापालट भारतासाठीही तितकच महत्वाचं आहे... मादागास्करमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट