माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय...त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डॉक्टर आणि महसूल मंत्री चंद्रशेखल बावनकुळेंचा कंपाउंडर म्हणून उल्लेख करत टीका केलीय...तर जरांगे पाटील हे सातारा गॅझेट लागू करण्याच्या दृष्टीने अधिक आक्रमक होत आहेत... यामध्ये जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेवटची सभा माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे घेतली...यावेळी त्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आहे...तसेच, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना बाहुबली चित्रपटातील कलकी सोबत केली आहे...