राज्यसभेत आज शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरुन जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. उत्तराखंडमध्ये झालेल्या कार्यक्रमात मल्लिकार्जून खरगेंनी भाषण केलं होतं. मात्र या भाषणानंतर मंचाचं शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप खरगेंनी केला. शुद्धीकरण करणारे लोक हे भाजपचे असल्याचा दावाही खरगेंनी केला.. त्यावरुन जोरदार गदारोळ झाला. मात्र शुद्धीकरण करणारे भाजपचे लोक नव्हते असं स्पष्टीकरण जे.पी. नड्डा यांनी दिलं.