BMC Warning for Mumbai | मुंबईत गणपतीच्या काळात 'या' पुलांवरून जाऊ नका, BMC चं आवाहन

मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात झाली असतानाच मुंबई महापालिकेने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील १२ पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात या पुलांचा वापर टाळावा किंवा कमीत कमी करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या धोकादायक पुलांच्या यादीत शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे, त्यामुळे मुंबईकर आणि बाहेरून येणाऱ्यांसाठी हा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.

संबंधित व्हिडीओ