शेतकऱ्यांच्या समस्यांवर पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांनी आता "संकटांची सवय लावून घ्यावी", असे सांगत, "कर्माची फळं भोगावी लागणार" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. नैसर्गिक आपत्ती आणि शेतीत येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.