राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीसह देशातील अनेक घटक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्यं केलंय. 'काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट या बुडत्या जहाजात पाय ठेवेल, असं मला वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तसंच, त्यांनी जर या जहाजात पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदाच होणार आहे, असंही फडणवीस म्हणालेत. . तर फडणवीसांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्युत्तर दिलंय