मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आज कोल्हापुरात पार पडला.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही काही मंत्री उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असणार आहे. गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. अखेर आज ही मागणी पूर्ण होते.