पालघर मनसेमधील अंतर्गत वादावरती अखेर राज ठाकरेंकडनं पडदा टाकण्यात आलाय. पक्ष सोडून गेलेले समीर मोरे यांची मनसेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. या आधी अविनाश जाधव हे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.