जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. कपाशी, तूर, मका, सोयाबीन, मुग, उडीद हे पाण्याखाली गेल्याने पीकं सडलीत.नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी आज भाजपा आमदार नारायण कुचे यांनी केली. बदनापूर तालुक्यातील दोन महसूल मंडळात जवळपास 9.71.3 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे..