Pahalgam Terror Attack| दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर, CSMT वर रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आलीय. मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला. मुंबई रेल्वे पोलीस दल आणि गृह रक्षक पोलिसांसोबत एमएसएफ पोलिसांकडून डॉग स्क्वॉड, संपूर्ण टीमसोबत रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल केले जात आहे.

संबंधित व्हिडीओ