उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. विद्यार्थी आंदोलन आणि अयोध्येतील राम मंदिरातील दान पेटी चोरीवर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. जनताच खरा विष्णूचा अवतार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. दिल्ली ते मुंबई, जनता भीतीच्या बंदुकीला घाबरत नाही असही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.दरम्यान ज्यांना देश चालवता ये नाही त्यांच्या हाती सत्ता असल्याची टीकाही ठाकरेंनी केलीय.