राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.सध्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी जुलैअखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या इंडियन ओशन डायपोल अर्थात ‘आयओडी’ तटस्थ अवस्थेत असला, तरी २१ जुलैनंतर तो सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे २२ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.