पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचं वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं. याचं काही जणांनी स्वागत केलं तर विरोधकांनी मात्र यावर जोरदार टीका केली.. सोन्याची सगळ्यात जास्त उलाढाल मुंबईतल्या झवेरी बाजारमध्ये होते.. इथे पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयानंतर इथले व्यापारी, कारागीर यांच्यात मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सोन्याची खरेदी खरंच कमी झाली तर व्यापारी काही दिवस टिकाव धरतील पण हातावर पोट असणारे कारागीर मात्र चिंतेत आहेत..