सध्या श्रावण महिना सुरू आहे.. श्रावणात बरेच सणवार आहेत... आणि गणपतीचा सणही तोंडावर आहे... अशा वेळी साखर, नारळ, गूळ, तांदूळ सगळंच महागलंय... एवढंच काय तुम्ही गणपतीला कोकणात जाणार असाल तर टोलचे दरही वाढलेत... एकंदरीतच किचन बजेटची पुरती वाट लागलेली असताना घराबाहेरचा प्रवासही महागलाय... कारण रिक्षा, टॅक्सीचे दरही १ सप्टेंबरपासून वाढणार आहेत.... पाहुया काय काय महाग झालंय... आणि पुढच्या काळात या महागाईचा सामना करण्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करावी लागणार आहे