जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच तोडगा निघेल असं विधान खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. आमचे एकशे चाळीस जागांवरती लढण्याची तयारी असल्याचंही विनायक राऊत म्हणतायत सावंतवाडी मतदार संघावरती ठाकरे गटाचा दावा आहे. मोदी शहांकडून ठाकरेंशी बोलण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात होतं.