मुंबईत वॉटर टँकर असोशिएशनने कालपासून संप पुकारलाय. त्यामुळे मुंबईकरांचे पुर्ते हाल झालेत.केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना नोटीशी बजावल्यात..त्यामुळे विहिरी, बोअरवेलमधून पाणीउपशावर बंदी घालण्यात आली. मुंबई महापालिकेच्या नोटीसविरोधात टँकर असोशिएनने संप पुकारलाय.त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायटया आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होतोय. पाणी नसल्यानं मोठ्या उद्भवू लागल्यात.