बीड मधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने उलटलेत. अटक केलेल्या आरोपींवर खटलाही सुरु झालाय. पण तरीही या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होण्याचं सत्र काही थांबत नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मीक कराड याचा सरकारला एन्काउंटर करायचा होता असा दावा बीड मधल्या एका पोलीस अधिकाऱ्याने केलाय.