बीडच्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अर्जुन घोडके यांच्या शेतातील पीक परतीच्या पावसाने हिरावले. तुटपुंज्या शासकीय मदतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरसमोर लोटांगण आणि शिर्षासन केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत मिळावी, ही त्यांची मागणी आहे.