पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ७०५ हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दसऱ्यापूर्वी भाताच्या लोंब्या दिसण्याची परंपरा यंदा तुटल्याने सणासुदीच्या काळात बळीराजा संकटात सापडला आहे. डहाणू, वाडा, जव्हारसह पालघरमधील शेतकरी तातडीच्या मदतीची मागणी करत आहेत.