नाशिकमध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. नाशिकरोड येथील वडनेर दुमाला गावात बिबट्याच्या हल्ल्यात आयुष किरण भगत नावाच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर, रक्षाबंधनाच्या दिवशीच त्याच्या बहिणीने आपल्या मृत भावाच्या थंड हातावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला