माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांवर दुबार-तिबार मतदान असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. त्यांचे पुतणे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे तीन ठिकाणी मतदार यादीत आढळली आहेत. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.