मुंबईसह उपनगरांमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं कोकण, मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सखल भागात पाणी साचलं असून कुर्ला स्थानकावर रुळावर पाणी जमा झालं आहे, तर अंधेरी सबवेमधील वाहतूक बंद करण्यात आली आहे.