ज्यांना चारवेळा जनतेनं घरी बसवलं, त्यांनी माझ्यावर टीका करू नये.सिंघम म्हणून कोण सिंघम होत नाही, लोकांनी सिंघम म्हटलं पाहिजे असा टोला मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उबाठाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांना लगावला आहे. तसेच बाळ माने हे निराशेतून बोलत असतात, मला त्याने काही जखमा होत नाहीत असंही मंत्री सामंत म्हणालेत.