संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि अंतिम गोल रिंगण आज वाखरी येथील बाजीराव विहिरीजवळ हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पालखी सोहळा आता वाखरीत दाखल झाला असून, आज येथे शेवटचा मुक्काम असणार आहे. रिंगण सोहळ्यात वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.