Operation Sindoor | अणवस्त्रांमुळेच जेव्हा पाकिस्तान भारताविरुद्ध लढाईत धोक्यात आला, Special Report

ताकद ही फक्त असून चालत नाही ती केव्हा वापरायची का वापरायची कशी वापरायची आणि कोण विरोधात वापरायची याचं ज्ञानही असावं लागतं आणि जर ते ज्ञान नसेल तर ताकद असूनही निरुपयोगी ठरते किंवा मग दुसराच कुणीतरी त्याचा फायदा उठवण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत नेमकं हेच घडलेलं आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवू बघतो तेव्हा तेव्हा पाकिस्तानची आण्विक शस्त्र अडचणीचा मुद्दा म्हणून समोर येतात. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पाकिस्ताननं जे काही केलं त्यामुळे पाकिस्तानची ही ताकद त्यांच्याच मुळावर उठण्याची वेळ आली आहे. 

संबंधित व्हिडीओ