देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. त्याचबरोबर काश्मीर आपलंय आणि आपलंच आहे असंही ठाकरे म्हणाले. शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती मिळते आहे.