यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात तापमान तब्बल 45 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या उकाड्यामुळे अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिग्रस शहरात तिघांचे मृतदेह आढळून आले असून त्यानंतर आर्णी आणि बाबुळगाव तालुक्यातही प्रत्येकी एक मृतदेह आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक राठोड यांनी.