अहिल्यानगरला हवामान विभागाने 12 ते 14 मे दरम्यान उष्णतेचा यलो अलर्ट दिलाय. त्यामुळे नेहमी गजबजलेली कापड बाजारपेठ सध्या शांत दिसू लागलीय. सध्या शहराचे तापमान 42 ते 43 अंशांच्या पुढे गेलंय.त्यामुळे अनेक दुकानदारांनी दुपारच्या सत्रात आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय महत्त्वाचे काम असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि सुती कपड्यांचा वापर करूनच घराबाहेर बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कापड बाजार येथून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे..