मुंबईतील चेंबूर येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या चौकशी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यां आणि कर्मचाऱ्यांविरोधातील तब्बल 537 चौकशा अद्याप प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये 1523 कर्मचाऱ्यांचा समावेश असून 30 एप्रिल 2026 पर्यंत ही प्रकरणे निकाली निघालेली नाहीत.