विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला नागपूर आणि अमरावती परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे... मात्र सध्या अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बागांमध्ये संत्र्याचा अक्षरशः सडा पडला आहे.सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील अनियमित बदलांमुळे संत्र्याच्या झाडांवर ताण आला आहे,ज्यामुळे संत्र्यांची गळण वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होतोय.