दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेणार आहे. या संदर्भात दाखल याचिकेवर 27 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला होता.