गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून देशात चांगलंच वातावरण तापलं आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आज सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. तब्बल एक तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.. तर तोडगा निघाला नाही तर आंदोलन व्यापक करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा थेट इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलाय.