विदर्भात 45 डिग्रीवर तापमान गेलंय.. अशात नद्या कोरड्या पडणे अपेक्षित असताना कित्येक ठिकाणी एक चमत्कारी दृश्य पाहायला मिळते आहे.. गेल्या वर्षी जिथे जल युक्त शिवार अभियानाची कामे झाली तिथे एकाच वर्षात प्रचंड बदल पडला आहे.. गावाजवळच्या नदीत भरपूर पाणी दिसते आहे, विहिरींची पातळी मोठ्या फरकाने वाढली आहे. आणि नदीच्या पाण्यात भर उन्हात बगळे खेळताना दिसत आहेत.. ही बाब समोर आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा रिॲलिटी चेक केला.. पाहूया..