काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करणाऱ्या लेखाच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखरूपात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं – “ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात. फडणवीस यांचं म्हणणं आहे की, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला जनता वारंवार नाकारते आहे, म्हणूनच आता ते ईव्हीएम यंत्रांवर शंका घेत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.