Nandurbar| पावसामुळे नंदुरबारमध्ये 9 गावांमध्ये नुकसान, वादळी वाऱ्यामुळे 122 कुटुंबीय उघड्यावर

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात काल सायंकाळी आणि रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाच मोठा नुकसान झालं. असून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या शेतकऱ्यांचा बांधावर आणि गावात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचा नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कडे केली. तसेच पावसामुळे शेती पिकाचा नुकसान झाला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली. वादळी वारा आणि पावसामुळे पूर्व भागातील 9 गावांमध्ये 122 घरांची पडझड झाली आहे तर खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मन्साराम भील वय 24 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर चुलत भाऊ दिनेश बन्सीलाल भील हे जखमी झाले आहेत. खर्दे गावात मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे आमदार विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

संबंधित व्हिडीओ