धाराशिव जिल्ह्यात नदीच्या पुरात अडकलेल्या 50 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलंय.धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी माहिती दिली. NDRF आणि आर्मीच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरात अनेक नागरिक अडकले होते.नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.. दरम्यान आता खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं.दरम्यान, धाराशीवमधील पूरस्थितीनंतर यंत्रणांकडून मदतकार्य करण्यात येत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय.