विधानपरिषदेत देखील हा प्रश्न चर्चेला आला आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्याला हात घालत एकप्रकारे भाजपवर आणि भाजपचे स्थानिक नेते जयकुमार गोरे यांच्यावरच नाराजी व्यक्त केलीय.महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली, मतदानापासूनच वंचित ठेवल्याचा प्रकार हा महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नसेल असंही एकनाथ शिंदे म्हणालेयत,तर योग्य चौकशी करून कारवाई करू असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दिलंय.