इराण इस्त्रायल युद्धामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. लोकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागतेय. त्यामुळे घरात पीएनजी कनेक्शन लावून घ्या, असे आवाहन केंद्र तसेच राज्यातील सरकारकडून केले जात आहे. पीएनजी कनेक्शन लवकरात लवकर दिले जावे यासाठी नियम आणि अटी शिथील करण्यात आल्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.