हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापुरमध्ये लग्न सोहळ्याचा मंडप उडून गेल्याची घटना घडली.वादळ आल्याने लग्नमंडप उडालाय.लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वीच वादळ आलं.त्यावेळी ही घटना घडलीय. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली.दरम्यान या घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.